Wednesday, May 9, 2012

माझी एक कविता

माझी एक कविता खूप दिवसापासून अपूर्ण आहे
म्हणून वहीच शेवटचं पान अजून कोर आहे
इथे संपत आल्याचाही लोक वापर करत असतात
तुटलेल्या तर दिसल्या कि त्यालाही काही तरी मागत राहतात
तुटलेले धागे पुन्हा जोडता येतात
पण जोडाच्या जागी गाठी कायम असतात
चेतल्या माझ्या मनात कोळसा तू होवू नकोस
राख झाली जिंदगी तरी लाचार तू होवू नको
फुलांच्या सन्मान इथं काटयांचा रोष आहे
स्वतःच स्वतःची रक्षा करण इथं काटयांचा दोष आहे
कुणाशी मैत्री करायची ठरवली तर अशी करावी

स्वत: उन्हात उभं राहून त्यावर सावली धरावी
पिंजऱ्यातल्या त्या पक्षाला उडता पतंग जळवत होता

खर तर त्या पतंगालाही एक माणूसच खेळवत होता
जनावरांसारख वागायचं माणसांनीच ठरवलंय

माणसांच्या या बाजारात माणूसपणचं हरवलंय
चार दिवसांच्या तारुण्यानंतर पुढे कायमचे म्हातारपण

त्यात नुसत्या आठवणी आणि सोबतीला वेगवेगळे आजारपण
पुसणारं कोण असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे

कुणाचे डोळे भरणार नसतील तर मरण सुद्धा व्यर्थ आहे.
                                                               - विजय साळवे

0 comments:

Post a Comment

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More