माझी एक कविता खूप दिवसापासून अपूर्ण आहे
म्हणून वहीच शेवटचं पान अजून कोर आहे
इथे संपत आल्याचाही लोक वापर करत असतात
तुटलेल्या तर दिसल्या कि त्यालाही काही तरी मागत राहतात
तुटलेले धागे पुन्हा जोडता येतात
पण जोडाच्या जागी गाठी कायम असतात
चेतल्या माझ्या मनात कोळसा तू होवू नकोस
राख झाली जिंदगी तरी लाचार तू होवू नको
फुलांच्या सन्मान इथं काटयांचा रोष आहे
स्वतःच स्वतःची रक्षा करण इथं काटयांचा दोष आहे
कुणाशी मैत्री करायची ठरवली तर अशी करावी
स्वत: उन्हात उभं राहून त्यावर सावली धरावी
पिंजऱ्यातल्या त्या पक्षाला उडता पतंग जळवत होता
खर तर त्या पतंगालाही एक माणूसच...